पोस्ट्स

" वारकरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्यावतीने महाआरोग्य शिबिर आयोजित "

इमेज
 पंढरपूर.... .   विठुरायाच्या नगरीमध्ये लाखोच्या संख्येने विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर चालत येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी,त्याच्या आरोग्याची काळजी महाराष्टर शासन गेल्या काही वर्षापासून प्रत्येक यात्रेच्या काळामध्ये घेत असते.या महाआरोग्य शिबिराचा लाभ लाखोच्या संख्येनेभाविक भक्ताना होत आहे.विठूरायाचे वारकरी हे विठ्ठलाचे मुर्त स्वरुप म्हणून ओळखले जातात.असे भाविक भक्त आळदी ते पंढरपूर पायी चालत ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता ते विठूरायाच्या दर्शनासाठी,आपले सुखदुख विठूरायाला संगण्यासाठी वारकरी येतात. .   महाराष्ट शासन आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी यात्रा कालावधी मध्ये हजारोच्या संख्येने वैद्यकिय अधिकारी,कर्मचारी,तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपचार यंत्रना ही राबवली जात आहे.दिनाक24 ते 26 जुलै या काळात पंढरपूर येथील तीन रस्ता सोलापूर...बार्शी रोड या स्थळी महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे.तरी सर्व भाविक भक्तानी या आरोग्य शिबिराचा मोफत लाभ घ्यावा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,आर...

" यात्रा कालावधी मध्ये दोन वेळेला पाणी पुरवठा करा" पंढरपूर करांची मागणी.....

इमेज
 पंढरपूर... .      पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भावी भक्त विठुरायाच्या नगरीमध्ये प्रवेश करीत आहेत आणि या वारकरी भावीक मठामधून  लॉजमधून त्याचप्रमाणे रहिवासी घरामधून हे भाविक भक्त राहत असतात या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची अत्यंत गरज असते परंतु पंढरपूर नगरपालिकेने आषाढी यात्रा च्या निमित्ताने सर्वत्र एक वेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले की काय असे दिसून येत आहे कमीत कमी अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत या कालावधीमध्ये दोन वेळेस पंढरपूर नगरपालिकेने पाणीपुरवठा करावा अशी मागणी पंढरपूर शहरात राहणारे रहिवासी व भाविक भक्त करीत आहेत. .     पंढरपूर नगरपालिका तसेच महाराष्ट्र शासन पंढरपूरकरांची यात्रा कालावधीमध्ये दोन वेळेच्या पाण्याची मागणी पूर्ण करेल काय?

" संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची बंधू भेट आज माळशिरस तालुक्यात झाली ".... पंढरपूर तालुक्याच्या दिशेने मार्गस़्त.....

इमेज
 पंढरपूर. .     आज आषाढ शुध्द अष्टमीला तोंडली येथील सोहळा आटपून तुफान काका व माऊली ज्ञानेश्वरांची बंधू भेट माळशिरस तालुक्यात हद्दीत झाली. .    माऊलींच्या पालखीचा विसावा टप्पा या ठिकाणी होत असतो त्याचवेळी संत सोपान काका यांच्या पालखीची व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्यातील हद्दीत झाली. सोपान काका व ज्ञानेश्वर माऊलींचे रथ शेजारी आल्यानंतर थोडा वेळ थांबतात यावेळी दोन्ही संस्थांच्या वतीने परस्परांना नारळ व प्रसाद भेट दिला जातो तत्पूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखीचे ठाकूर व समाधी येथे नेतृत्व रिंगण संपन्न झाले माऊलीचे पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर व समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळ मृदंग च्या जयघोषात रिंगण सोहळा पार पडला. कुठे माऊलीची पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामास पोहोचले. .   यावेळी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची पंढरपूर तालुक्यात आगमन झाले या पालख्यांचे पंढरपूर तालुक्या प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे ग...

" नाही तमा ऊन वारा पाऊसाची . ओढ आम्हा विठूरायाची"... लाखोच्या संख्येनी वारकरी पंढरीत दाखल..

इमेज
 पंढरपूर.... .       आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करत विठूरायाचा नगरीमध्ये दाखल होत आहे. .     संपूर्ण महाराष्ट्रभरामधून तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश अशा अन्य राज्यांमधून लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत आहे आज पंढरपूरच्या दिशेने चोहोबाजूंनी येणाऱ्या रस्त्यावर पावसाचे आगमन आज दिसून आले या पावसाच्या सरीमध्ये वारकरी भावी भक्त चिंब भिजत विठुरायाच्या ओढीने, विठुरायाच्या दर्शनासाठी व त्याच्याकडे आपली खुशाली सुखदुःख सांगण्यासाठी हे वारकरी भावीक भक्त पंढरपूर मध्ये दाखल होत आहे लहान थोर वयोवृद्ध भाविक भक्त पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत आहेत या सर्व भाविक भक्तांचे शिवाय न्यूज पंढरपूरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत

" कास्ता पाईप कंपनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरी नगरीत हजर "

इमेज
 पंढरपूर....     आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांना व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती च्या वतीने सेवा उपलब्ध करून देणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी यांना ऊन वारा पाऊस यापासून  बचाव होण्यासाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून व कंपनीने तयार केलेले कास्ता पाईप कंपनीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना  रेनकोट चे वाटप करण्यात आले आणि त्याचप्रमाणे 15 फोटो बाय 50 या आकाराची चटई मंदिर समितीला भेट देण्यात आली . याशिवाय वारकरी भाविक भक्तांना प्रसाद वितरणासाठी 50000 उच्च प्रतीच्या प्रसाद पिशव्या तसेच वारकरी संप्रदायाच्या नित्यपटनातील महत्त्वाच्या ग्रंथ असलेल्या हरिपाठाच्या 75 हजार प्रति मंदिर समितीला भेट स्वरूपात देण्यात आल्या याशिवाय पोलीस शासकीय कर्मचारी पत्रकार यांनाही उच्च प्रतीचे रेनकोट वाटप करण्यात आले या साहित्याचा मोठ्या प्रमाणात भाविकांना लाभ होणार असून यात्रेच्या व्यवस्थापनालाही यामुळे हातभार लागणार आहे कास्ता पाईप कंपनीकडून मार्केट हेड वैभव केळकर महाराष्ट्र सेल्स प्रमुख प्रद...

" महाराष्ट्राचा वारकरी पाहुणा सुविधा वाचून वंचित राहता कामा नये " शासनाच्या निधीचा योग्य तो वापर व्हावा.

इमेज
 पंढरपूर....      नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आषाढी यात्रे पूर्व नेहमीप्रमाणे पंढरपूर शहराला भेट दिली आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या असंख्य लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी सुखसुविसुविधा आरोग्य स्वच्छ पाणी निर्मल चंद्रभागा नगरी याकरिता पाच कोटी रुपये चा निधी काही मिनिटातच जाहीर केला यापूर्वी देखील पाच कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने पंढरपूर तीर्थ विकासासाठी दिलेला आहे आता दहा कोटी रुपये चा निधी या आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहर व पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या असंख्य भाविक भक्तांच्या साठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापर केला जाणार आहे या निधीचा वापर योग्य प्रकारे व्हावा अशी माफक अपेक्षा पंढरपूर रहिवासी आणि वारकरी संप्रदायांमधील असंख्य भाविक भक्त करीत आहे. महाराष्ट्राचा वारकरी पाहुणा सुविधा वाचून वंचित राहता कामा नये अशी मनोकामना पंढरपूर वाशी करीत आहे.      महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पंढरपूर येथे भेट दिली असता सर्व ठिकाणी जाऊन वारकरी भाविक भक्तांचे साठी कुठल्या...

" आजी-माजी नेते मंडळींनी लोकांच्या हाताला काम न दिल्यामुळे लोकांना अतिक्रमण करून व्यवसाय करण्याशिवाय पर्याय राहिला नाही "..... दिगंबर सुडके उपाध्यक्ष जिल्हा सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस

इमेज
 पंढरपूर.....      नुकतीच आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमण व फुटपाथवर असलेले अतिक्रमण काढण्याचे नगरपालिका यांनी मोहीम राबवली आहे यामध्ये 30 ते 40 वर्ष बारीक सारीक खोके टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे असंख्य छोटे मोठे व्यापारी हे आज देशोधडीला लागले याची चित्र पंढरपूर शहरात सर्वत्र दिसून येत आहे. जगण्याचे साधनच पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केल्यामुळे या लोकांच्या मध्ये प्रचंड संताप व नैराश्य भरून राहिले आहे.       पंढरपूर तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेते मंडळींनी फक्त लोकांना औद्योगिक वसाहतीचे गाजर दाखवून आपली आमदारकी साजरी करत आले आहेत. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील लोकांना हाताला रोजगार नसल्यामुळे आणि पंढरपूर शहरांमध्ये भरणाऱ्या चार यात्रेच्या जीवावर आपला प्रपंच ते कसाबसा करीत आहेत. कुठलीही एमआयडीसी नाही किंवा कुठलाही मोठा उद्योग या परिसरामध्ये नसल्यामुळे चार वारी च्या नंतर लोकांना जगण्याचे काही साधन नसते म्हणून ते नगरपालिकेच्या जागेमध्ये उपजीविकेचे साधन म्हणून लहान सांन खोकी टाकू...

" कॅरीडोर बाधितांनी आता काळे झेंडे दाखवून उपयोग काय?"....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). नुकतेच पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांनी पंढरपूर येथे होणाऱ्या नवीन विकास आराखड्याला विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने येत्या आषाढी यात्रेच्या वेळी दशमी ते एकादशी च्या दिवशी संपूर्ण मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधित भागामध्ये असलेले रहिवाशी व व्यापारी यांनी निषेध व्यक्त करण्याच्या उद्देशाने या परिसरातील दुकाने व घरे हे बंद ठेवली जाणार आहेत त्याचप्रमाणे काळे झेंडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्याची तयारी केली आहे असे असे संभाव्य बाधितांच्या वतीने बाबा महाराज बडवे महाजन यांनी सांगितले.     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधित व्यापारी व रहिवाशांना विश्वासात न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करीत त्यांनी दशक्रिया एकादशी या दिवशी मुख्यमंत्री हे महापूजेला येणार आहेत त्यावेळी  काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी कॅरिडॉर बाधित असंख्य रहिवासी व व्यापारी वर्ग उपस्थित होते.       गेल्या तीन-चार वर्षापासून  "शिवाई "न्यूज पंढरपूर ...

" ज्या रस्त्यावर वहातुक जास्त तेच रस्ते डी.पी.रस्त्या अंतर्गत का नाही?.. हा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). पंढरपूर तीर्थ विकास आराखडा अंतर्गत कॅरीडोर योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहे. पंढरपूर शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन यांनी पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या करोडोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आणि त्यांचा पंढरपूर शहरातील मंदिर परिसरामधील वावर हा सुखकर व्हावा म्हणून कॅरिडॉर ही संकल्पना कार्यान्वित करण्याचे योजले आहे. यासाठी 4000 कोटी रुपये  शासनाने मंजूर केले आहेत.    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर  च्या आजूबाजू चा परिसर हा मोकळा करून भाविकांसाठी त्यांचा वावर या परिसरामध्ये सुटसुटीत व्हावा,मोकळा व्हावा त्यांना कुठलीही अडचणी येऊ नये म्हणून या परिसरामधील कित्येक घरे व दुकाने कॅरीडोर बाधित ठरवून त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले आहे. या कॅरिडॉर सोबतच पंढरपूर शहराला जोडणारे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात येणारे अंतर्गत रस्ते हे डीपी रस्त्या अंतर्गत मोठे करण्याचे नियोजन शासनाने योजले आहे. हे रस्ते 12 ते 18 मीटर या रुंदीचे असणार असू...

" डीपी रस्ता मध्ये जाणाऱ्या बाधितांना कॅरिडोर प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार का?"...... पंढरपूर वासियांना पडलेला प्रश्न.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतीच पंढरपूर विकास आराखड्यामध्ये कॅरीडोर या संकल्पनेला चालना मिळणार असे नुकतेच जाहीर झालेले आहे हजारो कोटी रुपये खर्च करून पंढरपूर या ठिकाणी येणाऱ्या विठुरायांच्या भाविक भक्तांच्या सुख सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे वारी कालावधीमध्ये होणारी अडचण ही आता या कॅरिडॉर च्या माध्यमातून  दूर केली जाणार आहे.      कॅरिडॉर अंतर्गत येणाऱ्या असंख्य बाधितांना चाळीस हजार ते वीस हजार रुपये पर्यंतचा चौरस फुटाचा दर मिळणार असे चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरू आहे. कॅरीडोर बाधितांप्रमाणेच पंढरपूर शहरातील विविध भागातील रस्ते हे डीपी रस्त्याच्या अंतर्गत 12 ते 18 मीटर या रुंदीचे होणार असे जाहीर झालेले आहे पंढरपूर शहरातील एकूण 22 रस्ते जे रस्ते विठ्ठलाच्या मंदिराचे दिशेने येतील असे असून या रस्त्यामध्ये येणारे असंख्य इमारती घरे दुकाने हे बाधित होणार आहेत या बाधितांना महाराष्ट्र शासन नुकसान भरपाई म्हणून काय मोबदला देणार हे अद्यापही जाहीर झालेले नाही. ज्या लोकांची घरे इमारती दुकाने ही जाणार आहेत या सर्वांची चिंता आता वाढलेली आहे या डीपी र...

" मराठी पत्रकार संघ" पंढरपूर यांच्या वतीने पत्रकारांसाठी मोफत अपघाती विमा योजना " अधिक्षक डाक घर पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे बहुमोल सहकार्य...

इमेज
 पंढरपूर.( प्रतिनिधी). रोज बाबतीत अनिश्चितता आणि असुरक्षितता त्याचप्रमाणे तुटपुंजे मानधन यातच आपलं कुटुंब यांचा उदरनिर्वाह असे दे भर वर्षाचे जीवन लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या पत्रकारांची आहे हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.      बातम्यांच्या माध्यमातून सतत होणाऱ्या राजकीय सामाजिक घडामोडी कडे लक्ष देत बातमीचा शोध घेत आपले जीवनमान घोषित करणारे हे पत्रकार काही वेळा त्यांना संरक्षणाची देखील गरज भासते त्यांच्यावर असंख्य ठिकाणी हल्ले झालेले आहेत हे आपण दररोजच पाहत आहोत अशा पत्रकारांना येण्याचे कवच लाभावे म्हणून मराठी पत्रकार संघ यांचे संस्थापक अध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचीव हरिभाऊ प्रक्षाळे यांचा अथक प्रयत्नातून मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना बजाज विमा कंपनीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण हे डाकघर पंढरपूर विभाग यांच्या सहकार्याने सर्व पत्रकारांचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून त्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मधील विविध योजना या कशा व कोणत्या आहेत याचा लाभ सर्वसामान्य जनतेला व पत्रकार ...

" आमदार समाधान दादा अवताडे यांनी मागणी केली आणि ती त्वरित पूर्ण झाली " पावसाचे वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेला सोडले.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्याला अद्यापही पावसाने ओढ दिल्यामुळे या तालुक्यामध्ये व पंढरपूर तालुक्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असून यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी कृष्णा पंचगंगा नदीचे पावसाचे बोराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेच्या कालव्यात सोडून मंगळवेढा तालुक्याचे जल संकट दूर करणे बाबत आमदार अवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन मागणी केली होती त्या मागणीची दखल घेऊन म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोडले असून याचा मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाला मोठा फायदा होणार आहे.      या निवेदनामध्ये आमदारा उतारे यांनी मागणी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की सध्या कृष्णा आणि पंचगंगा नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून आगामी दिवसात पावसाचा जोर वाढल्यास सदर नदीपात्रात पूर महापौर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात तसेच माझ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अध्यापिक पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणी करण्यासा...

"नदीकाठच्या शेतीपंपासाठी आठ तास वीज द्या..... सीना माढा उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करावी.".... आमदार अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) आज महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनामध्ये माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सेना माढा उपसा सिंचन योजना ही त्वरित सुरू करून 169 तलावे भरावेत आणि त्याच प्रमाणे शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या पंपासाठी आठ तास वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यांनी आपल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देऊन ही मागणी केली.        माढा तालुक्यामध्ये यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे उजनी धरणाच्या बोगद्यामधून सीना नदीत तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी करण्यात आली या दोन्ही मागण्यांची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.         यानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन माढा तालुक्यातील पाणी प्रश्न बाबत सविस्तर चर्चा केली सीना माढा योजना सिंचन योजना स्वरूप कार्यान्वित करून 169 तलाव भरण...

" पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभाग कायमस्वरूपी कार्यरत राहणार की.... फिर वही दिल लाया हु "

इमेज
 पढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभर ओळखले जाते पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्री विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो करोडो च्या संख्येने भावीक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यांना मूलभूत सुविधा व सुख सोयी या मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र शासन पंढरपूर या ठिकाणी कॅरीडोर ची संकल्पना राबवत आहे. वाराणसी व उज्जैन या तीर्थस्थळाच्या धर्तीवर पंढरपूर शहराचे कॅरीडोरचे नियोजन असल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे. त्यासाठी चार हजार 150 करोड रुपये शासनाने मंजूर केलेले आहे. मंदिर परिसरामध्ये होणारी दाटी वाटी आणि भाविक भक्तांना मार्गक्रमण करताना येणाऱ्या असंख्य अडचणी या जाणून घेऊन महाराष्ट्र शासनाने हा परिसर कॅरिडॉर च्या नावाखाली मोठा करण्यात येणार आहे. या परिसरातील शेकडोच्या संख्येने घरे दुकाने हे बाधित होणार आहेत.    मंदिर व अन्य ठिकाणी अतिक्रमणचे प्रमाण जास्त दिसून येते पंढरपूर शहरात प्रवेश करताच सर्वत्र अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी असून देखील त्या फुटपाथवर अतिक्रमण केल्याचे दुकाने मांडण्याचे दिसून येत आहे हे पंढरपूर नगरपालि...

" वारकरी भक्तांच्या सुविधासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा "...... राजेंद्र आहेर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या भावी भक्ता च्या सुविधासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पंढरपूर शहरातील पत्रकारांनी आवाज उठवावा असे आवाहन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी आज पंढरपूर येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पाचव्या महा अधिवेशनाच्या प्रसंगी बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.        पंढरपूर शहरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्य संख्येने भाविक भक्त येत असतात. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोपाळपूर या शहरापासून सात ते आठ किलोमीटर लांब अंतरावरून ऊन वारा पाऊस झेलत हे वारकरी भाविक भक्त दर्शनासाठी रांगेत येत असतात या वारकरी बांधवांच्या सुरक्षासाठी त्यांना ऊन वारा पाऊस यापासून बचाव करण्यासाठी कायमस्वरूपी या दर्शनबारीला पावसापासून व उन्हापासून सुरक्षा होण्यासाठी शेड मारण्यात यावे जेणेकरून पाऊस व उन्हापासून त्यांचा बचाव होईल तसेच पंढरपूर शहर आता विकास आराखड्यावर असल्यामुळे या ठिकाणी लाखो व कोटीच्या संख्येने भाविक भक्त येणार आहेत या ठिकाणी जे काही विकास कामे...

" पत्रकार कल्याण कुलकर्णी यांची जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड.... कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ही संघटना वंचित पीडित व दुर्बल घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असून मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. कल्याणराव कुलकर्णी यांच्या समाजसेवेला व संघटन  कौशल्याला आणखी बळ आणि कार्य विस्ताराला एक प्रकारे संधी मिळाली आहे  जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्या प्रित्यर्थ त्यांचे संपूर्ण जिल्हाभरामधून कौतुक व अभिनंदन याचा वर्षा होत आहे.      गेल्या पाच वर्षांमध्ये या संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्नावर आवाज उठवून जनतेच्या न्याय हक्कासाठी भरीव कार्य केले आहे संघटनेचे राष्ट्रीय राज्य विभागीय जिल्हा तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी सदस्य पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून संघटनेचे जाळे अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.       जागतिक मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी कल्याण कुलकर्ण...

" भाजपा पक्षाला विधान परिषदे ची निवडणुक जिंकू की हरणार अशी शंका वाटू लागली "......

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) जसजशी विधान परिषदेच्या निवडणुकी च्या  मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी राजकीय जाणकार तसेच मतदार आणि सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिक तर्कवितर्क करू लागले आहेत. भाजपा पक्षाचे मतदाराचे संख्याबळ मोठे असून देखील भाजपाचे पालकमंत्री जयकुमार यांना या निवडणुकीमधील मतदानाविषयी व मतदारांविषयी शंका वाटू लागली की काय असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामधून उपस्थित होऊ लागली आहे.त्यांनी नुकतेच म्हटले होते क्रॉस वोटिंग मला ओळखता येते आणि कोणी कोणाला मतदान केले हे देखील ओळखता येते असे म्हटल्यामुळे सर्वसामान्य जनता व जाणकार राजकीय व्यक्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणू लागले आहेत की, भाजपा पक्षाचे मतदारांच्या बद्दल भाजपाच्या नेत्या मंडळींना आपल्या विधान परिषदेच्या भाजपाच्या उमेदवाराला मतदान करतील की नाही? अशी शंका वाटू लागल्यामुळेच पालकमंत्री यांनी म्हटले असावे की मला क्रॉस वोटिंग ओळखता येते कोणी कोणाला मतदान केले हे ओळखता येते कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून निवडून आलेले असंख्य सदस्य हे नवखे आहेत. त्यामुळे आपण केलेले मतदान हे वर...

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सरसकट दिली जावी आणि कर्जमाफी बाबत असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात यासाठी पंढरपूर येथील शिवतीर्थावर अन्न त्याग उपोषण सुरू केले होते. तीन ते चार दिवस चाललेले हे अन्य त्याग  उपोषण ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी या उपोषणाच्या स्थळी येऊन रोहित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत जाचक अटी रद्द करण्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आणि आमदार रोहित पवार यांनी आपले अन्न त्याग  उपोषण सोडले.या वेळी  उपस्थित पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे भाजपाआमदार समाधान आवताडे तसेच विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजपाचे मान्यवर नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.      हे उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाच्या काही वाचाळ वीरांनी या उपोषण स्थळी येऊन गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध केल्याचे कार्य केले. याचा निषेध म्हणून पंढरपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले, उद्योगपती नाग...

" राजकारणात काहीही घडू शकते "

इमेज
 पंढरपूर( प्रतिनिधी) प्रेमात आणि युद्धात अशक्य असे काही नसते त्याचप्रमाणे राजकारणात देखील काही घडू शकते अशी नवीन म्हण तयार होऊ पाहत आहे.     सध्या महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या एकूण 18 जागांपैकी 8 जागा बिनविरोध निवडून आले आहेत.  आता उर्वरित दहा जागेसाठी विधान परिषद च्या निवडणुका लागलेल्या आहे. भाजपा या पक्षाच्या व अन्य पक्षाच्या  युतीने या विधान परिषदेच्या जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतु दहा जागेसाठी निवडणुका या लागलेल्या आहेत.     संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजपा व अन्य पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट  तसेच अपक्ष अशा विविध पक्षाने आपापली उमेदवारी अर्ज भरले होते परंतु एकास एक अशी निवडणूक व्हावी म्हणून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मध्ये आता चुरशीची लढत होणार की काय असे लक्षणे दिसून येत आहे.     सोलापूर जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून ये...

" साहेब...या रस्त्या वरुन ही येत जा"...

इमेज
 पंढरपूर( प्रतिनिधी). पंढरपूर नगरी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण देशामध्ये वैकुंठ नगरी म्हणून ओळखले जाते या पंढरपूर शहरांमध्ये सर्वसामान्य वारकरी भाविक भक्तांच्या साठी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याचप्रमाणे प्रशस्त असे रस्ते लाभावेत म्हणून आणि सर्वसामान्य वारकरी बांधवांना पंढरपूर शहरांमध्ये वावरताना गर्दी व चेंगराचेंगरी याचा अनुभव येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने वाराणसी तसेच उज्जैन या तीर्थक्षेत्राच्या धरतीवर कॅरीडोर ही संकल्पना राबवण्याची ठरवलेले आहे त्यासाठी चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये निधी देखील उपलब्ध झालेला आहे संपूर्ण शहरांमध्ये सुधारण्याचे व आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहे भाविकांना व सर्वसामान्य रहिवाश्यांना याचा लाभ होणार हे खरे आहे परंतु ....     पंढरपूर शहरांमध्ये अधिक मासाच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. पंढरपूर शहरांमधील प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे, पंढरपूर नगरपालिका ते अर्बन बँक आणि अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा म्हणून ओळखला जातो या रस्त्याच्या ...