पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" भाजपा पक्षाला विधान परिषदे ची निवडणुक जिंकू की हरणार अशी शंका वाटू लागली "......

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) जसजशी विधान परिषदेच्या निवडणुकी च्या  मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी राजकीय जाणकार तसेच मतदार आणि सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिक तर्कवितर्क करू लागले आहेत. भाजपा पक्षाचे मतदाराचे संख्याबळ मोठे असून देखील भाजपाचे पालकमंत्री जयकुमार यांना या निवडणुकीमधील मतदानाविषयी व मतदारांविषयी शंका वाटू लागली की काय असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामधून उपस्थित होऊ लागली आहे.त्यांनी नुकतेच म्हटले होते क्रॉस वोटिंग मला ओळखता येते आणि कोणी कोणाला मतदान केले हे देखील ओळखता येते असे म्हटल्यामुळे सर्वसामान्य जनता व जाणकार राजकीय व्यक्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणू लागले आहेत की, भाजपा पक्षाचे मतदारांच्या बद्दल भाजपाच्या नेत्या मंडळींना आपल्या विधान परिषदेच्या भाजपाच्या उमेदवाराला मतदान करतील की नाही? अशी शंका वाटू लागल्यामुळेच पालकमंत्री यांनी म्हटले असावे की मला क्रॉस वोटिंग ओळखता येते कोणी कोणाला मतदान केले हे ओळखता येते कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून निवडून आलेले असंख्य सदस्य हे नवखे आहेत. त्यामुळे आपण केलेले मतदान हे वर...

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सरसकट दिली जावी आणि कर्जमाफी बाबत असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात यासाठी पंढरपूर येथील शिवतीर्थावर अन्न त्याग उपोषण सुरू केले होते. तीन ते चार दिवस चाललेले हे अन्य त्याग  उपोषण ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी या उपोषणाच्या स्थळी येऊन रोहित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत जाचक अटी रद्द करण्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आणि आमदार रोहित पवार यांनी आपले अन्न त्याग  उपोषण सोडले.या वेळी  उपस्थित पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे भाजपाआमदार समाधान आवताडे तसेच विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजपाचे मान्यवर नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.      हे उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाच्या काही वाचाळ वीरांनी या उपोषण स्थळी येऊन गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध केल्याचे कार्य केले. याचा निषेध म्हणून पंढरपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले, उद्योगपती नाग...

" राजकारणात काहीही घडू शकते "

इमेज
 पंढरपूर( प्रतिनिधी) प्रेमात आणि युद्धात अशक्य असे काही नसते त्याचप्रमाणे राजकारणात देखील काही घडू शकते अशी नवीन म्हण तयार होऊ पाहत आहे.     सध्या महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या एकूण 18 जागांपैकी 8 जागा बिनविरोध निवडून आले आहेत.  आता उर्वरित दहा जागेसाठी विधान परिषद च्या निवडणुका लागलेल्या आहे. भाजपा या पक्षाच्या व अन्य पक्षाच्या  युतीने या विधान परिषदेच्या जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतु दहा जागेसाठी निवडणुका या लागलेल्या आहेत.     संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजपा व अन्य पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट  तसेच अपक्ष अशा विविध पक्षाने आपापली उमेदवारी अर्ज भरले होते परंतु एकास एक अशी निवडणूक व्हावी म्हणून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मध्ये आता चुरशीची लढत होणार की काय असे लक्षणे दिसून येत आहे.     सोलापूर जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून ये...