पोस्ट्स

" वारकरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्यावतीने महाआरोग्य शिबिर आयोजित "

इमेज
 पंढरपूर.... .   विठुरायाच्या नगरीमध्ये लाखोच्या संख्येने विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर चालत येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी,त्याच्या आरोग्याची काळजी महाराष्टर शासन गेल्या काही वर्षापासून प्रत्येक यात्रेच्या काळामध्ये घेत असते.या महाआरोग्य शिबिराचा लाभ लाखोच्या संख्येनेभाविक भक्ताना होत आहे.विठूरायाचे वारकरी हे विठ्ठलाचे मुर्त स्वरुप म्हणून ओळखले जातात.असे भाविक भक्त आळदी ते पंढरपूर पायी चालत ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता ते विठूरायाच्या दर्शनासाठी,आपले सुखदुख विठूरायाला संगण्यासाठी वारकरी येतात. .   महाराष्ट शासन आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी यात्रा कालावधी मध्ये हजारोच्या संख्येने वैद्यकिय अधिकारी,कर्मचारी,तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपचार यंत्रना ही राबवली जात आहे.दिनाक24 ते 26 जुलै या काळात पंढरपूर येथील तीन रस्ता सोलापूर...बार्शी रोड या स्थळी महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे.तरी सर्व भाविक भक्तानी या आरोग्य शिबिराचा मोफत लाभ घ्यावा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,आर...

" यात्रा कालावधी मध्ये दोन वेळेला पाणी पुरवठा करा" पंढरपूर करांची मागणी.....

इमेज
 पंढरपूर... .      पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भावी भक्त विठुरायाच्या नगरीमध्ये प्रवेश करीत आहेत आणि या वारकरी भावीक मठामधून  लॉजमधून त्याचप्रमाणे रहिवासी घरामधून हे भाविक भक्त राहत असतात या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची अत्यंत गरज असते परंतु पंढरपूर नगरपालिकेने आषाढी यात्रा च्या निमित्ताने सर्वत्र एक वेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले की काय असे दिसून येत आहे कमीत कमी अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत या कालावधीमध्ये दोन वेळेस पंढरपूर नगरपालिकेने पाणीपुरवठा करावा अशी मागणी पंढरपूर शहरात राहणारे रहिवासी व भाविक भक्त करीत आहेत. .     पंढरपूर नगरपालिका तसेच महाराष्ट्र शासन पंढरपूरकरांची यात्रा कालावधीमध्ये दोन वेळेच्या पाण्याची मागणी पूर्ण करेल काय?

" संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची बंधू भेट आज माळशिरस तालुक्यात झाली ".... पंढरपूर तालुक्याच्या दिशेने मार्गस़्त.....

इमेज
 पंढरपूर. .     आज आषाढ शुध्द अष्टमीला तोंडली येथील सोहळा आटपून तुफान काका व माऊली ज्ञानेश्वरांची बंधू भेट माळशिरस तालुक्यात हद्दीत झाली. .    माऊलींच्या पालखीचा विसावा टप्पा या ठिकाणी होत असतो त्याचवेळी संत सोपान काका यांच्या पालखीची व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्यातील हद्दीत झाली. सोपान काका व ज्ञानेश्वर माऊलींचे रथ शेजारी आल्यानंतर थोडा वेळ थांबतात यावेळी दोन्ही संस्थांच्या वतीने परस्परांना नारळ व प्रसाद भेट दिला जातो तत्पूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखीचे ठाकूर व समाधी येथे नेतृत्व रिंगण संपन्न झाले माऊलीचे पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर व समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळ मृदंग च्या जयघोषात रिंगण सोहळा पार पडला. कुठे माऊलीची पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामास पोहोचले. .   यावेळी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची पंढरपूर तालुक्यात आगमन झाले या पालख्यांचे पंढरपूर तालुक्या प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे ग...

" नाही तमा ऊन वारा पाऊसाची . ओढ आम्हा विठूरायाची"... लाखोच्या संख्येनी वारकरी पंढरीत दाखल..

इमेज
 पंढरपूर.... .       आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करत विठूरायाचा नगरीमध्ये दाखल होत आहे. .     संपूर्ण महाराष्ट्रभरामधून तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश अशा अन्य राज्यांमधून लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत आहे आज पंढरपूरच्या दिशेने चोहोबाजूंनी येणाऱ्या रस्त्यावर पावसाचे आगमन आज दिसून आले या पावसाच्या सरीमध्ये वारकरी भावी भक्त चिंब भिजत विठुरायाच्या ओढीने, विठुरायाच्या दर्शनासाठी व त्याच्याकडे आपली खुशाली सुखदुःख सांगण्यासाठी हे वारकरी भावीक भक्त पंढरपूर मध्ये दाखल होत आहे लहान थोर वयोवृद्ध भाविक भक्त पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत आहेत या सर्व भाविक भक्तांचे शिवाय न्यूज पंढरपूरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत

" कास्ता पाईप कंपनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरी नगरीत हजर "

इमेज
 पंढरपूर....     आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांना व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती च्या वतीने सेवा उपलब्ध करून देणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी यांना ऊन वारा पाऊस यापासून  बचाव होण्यासाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून व कंपनीने तयार केलेले कास्ता पाईप कंपनीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना  रेनकोट चे वाटप करण्यात आले आणि त्याचप्रमाणे 15 फोटो बाय 50 या आकाराची चटई मंदिर समितीला भेट देण्यात आली . याशिवाय वारकरी भाविक भक्तांना प्रसाद वितरणासाठी 50000 उच्च प्रतीच्या प्रसाद पिशव्या तसेच वारकरी संप्रदायाच्या नित्यपटनातील महत्त्वाच्या ग्रंथ असलेल्या हरिपाठाच्या 75 हजार प्रति मंदिर समितीला भेट स्वरूपात देण्यात आल्या याशिवाय पोलीस शासकीय कर्मचारी पत्रकार यांनाही उच्च प्रतीचे रेनकोट वाटप करण्यात आले या साहित्याचा मोठ्या प्रमाणात भाविकांना लाभ होणार असून यात्रेच्या व्यवस्थापनालाही यामुळे हातभार लागणार आहे कास्ता पाईप कंपनीकडून मार्केट हेड वैभव केळकर महाराष्ट्र सेल्स प्रमुख प्रद...

" महाराष्ट्राचा वारकरी पाहुणा सुविधा वाचून वंचित राहता कामा नये " शासनाच्या निधीचा योग्य तो वापर व्हावा.

इमेज
 पंढरपूर....      नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आषाढी यात्रे पूर्व नेहमीप्रमाणे पंढरपूर शहराला भेट दिली आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या असंख्य लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी सुखसुविसुविधा आरोग्य स्वच्छ पाणी निर्मल चंद्रभागा नगरी याकरिता पाच कोटी रुपये चा निधी काही मिनिटातच जाहीर केला यापूर्वी देखील पाच कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने पंढरपूर तीर्थ विकासासाठी दिलेला आहे आता दहा कोटी रुपये चा निधी या आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहर व पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या असंख्य भाविक भक्तांच्या साठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापर केला जाणार आहे या निधीचा वापर योग्य प्रकारे व्हावा अशी माफक अपेक्षा पंढरपूर रहिवासी आणि वारकरी संप्रदायांमधील असंख्य भाविक भक्त करीत आहे. महाराष्ट्राचा वारकरी पाहुणा सुविधा वाचून वंचित राहता कामा नये अशी मनोकामना पंढरपूर वाशी करीत आहे.      महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पंढरपूर येथे भेट दिली असता सर्व ठिकाणी जाऊन वारकरी भाविक भक्तांचे साठी कुठल्या...

" आजी-माजी नेते मंडळींनी लोकांच्या हाताला काम न दिल्यामुळे लोकांना अतिक्रमण करून व्यवसाय करण्याशिवाय पर्याय राहिला नाही "..... दिगंबर सुडके उपाध्यक्ष जिल्हा सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस

इमेज
 पंढरपूर.....      नुकतीच आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमण व फुटपाथवर असलेले अतिक्रमण काढण्याचे नगरपालिका यांनी मोहीम राबवली आहे यामध्ये 30 ते 40 वर्ष बारीक सारीक खोके टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे असंख्य छोटे मोठे व्यापारी हे आज देशोधडीला लागले याची चित्र पंढरपूर शहरात सर्वत्र दिसून येत आहे. जगण्याचे साधनच पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केल्यामुळे या लोकांच्या मध्ये प्रचंड संताप व नैराश्य भरून राहिले आहे.       पंढरपूर तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेते मंडळींनी फक्त लोकांना औद्योगिक वसाहतीचे गाजर दाखवून आपली आमदारकी साजरी करत आले आहेत. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील लोकांना हाताला रोजगार नसल्यामुळे आणि पंढरपूर शहरांमध्ये भरणाऱ्या चार यात्रेच्या जीवावर आपला प्रपंच ते कसाबसा करीत आहेत. कुठलीही एमआयडीसी नाही किंवा कुठलाही मोठा उद्योग या परिसरामध्ये नसल्यामुळे चार वारी च्या नंतर लोकांना जगण्याचे काही साधन नसते म्हणून ते नगरपालिकेच्या जागेमध्ये उपजीविकेचे साधन म्हणून लहान सांन खोकी टाकू...