पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार "....... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे व संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण मंगळवेढा येथे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित असंख्य मान्यवर मंत्री गण आमदार व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणास पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने अवश्य यावे. असे निमंत्रण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी दिले.

"आमदार समाधान दादा अवताडे यांनी मरीआई वाले समाजबांधवाची केली दिपावली गोड"...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) मरीआई वाले समाज  हा गेल्या कित्येक वर्षापासून वंचित असलेला समाज म्हणून ओळखला जातो. या मरी आई वाले समाजामधील बांधव अतिशय हलकीचे जीवन जगत आहेत. हे मरी आई वाले समाज बांधव गावाबाहेरील उघड्या शेतमाळावर आपल्या झोपड्या टाकून राहतात राहूटी  टाकून राहतात. ऊन, पाऊस, वारा ,थंडी अशा परिस्थितीमध्ये ते या झोपडी मधून राहतात, राहुटी मधून राहतात.  अशा बांधवांना दीपावलीच्या निमित्ताने मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी या ठिकाणी राहत असलेल्या मरीआई वाले समाजातील बांधवांना दीपावलीच्या निमित्ताने साडी, कपडे फराळाचे साहित्य यांचे वाटप करून त्या गोरगरीब असलेल्या मरीआईवाले समाज बांधवांची दीपावली यंदाच्या वर्षी आमदार समाधान आवताडे यांनी गोड केली. मरीआई वाले समाज बांधवांनी आमदार समाधान आवताडे यांची आभार मानले.       या वेळी मरीआई वाले समाज बांधव तसेच गावकरी उपस्थित होते.

"84 कोटीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार".......... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . अतिवृष्टीचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतामधील पिकांचे त्याचप्रमाणे मका सूर्यफूल बाजरी टोमॅटो मिरची कांदा भुईमूग उडीद दोडका डाळिंब पेरू या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिलेला असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील 88 हजार पाचशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यावर 84 कोटी 45 लाख रुपये नुकसान भरपाई जमा करणे होण्यास सुरुवात झाली असून दिवाळी सर्व नुकसान भरपाई खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी आज रोजी दिली.       यंदाचा खरीप पिकांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेले आहे. या संकटाशी सामना करण्याचे शेतकऱ्यांना बळ देण्या साठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला . माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली नुकसान त्...

" प्रशांतराव आम्ही सत्तेत नाही असे म्हणू नका... आम्ही सत्तेत आहोत म्हणजे तुम्ही देखील सत्तेत आहात"... ... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) प्रशांतराव आम्ही सत्तेत नाही असे म्हणू नका आम्ही सत्तेत आहोत म्हणजेच तुम्ही देखील सत्तेत आहात. असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रोजी श्रीपुर या ठिकाणी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याप्रसंगी त्याने आपले मनोगत व्यक्त केले.      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढत त्यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळा अनावरण व अन्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे शब्द प्रशांत रावांना दिल्यानंतर या ठिकाणी आलो असता परिचारक गटाकडून कोणालाही निमंत्रण जास्त प्रमाणात देता आले नाही. तरी देखील स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या वरील प्रेमापोटी या ठिकाणी आलेला हा जनसमुदाय पाहता स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या कार्याची महती दिसून येते.       स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संत नेतृत्व, अनुभवी नेतृत्व, निस्वार्थी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होत...

"विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त... आमदार अभिजीत आबा पाटील विठ्ठलाच्या पादुका घेऊन देगाव कडे प्रस्थान करणार ".....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठुरायाच्या पादुका घेऊन माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील हे आपल्या देगाव गावाकडे दिंडी मधून उद्या सकाळी आठ वाजता ते विठुरायाच्या पादुका घेऊन जाणार आहेत.      या विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव 2025 च्या निमित्ताने भव्य कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. या कीर्तन सोहळ्यामध्ये बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन दुपारी एक वाजता होणार असून त्याचप्रमाणे ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन सायंकाळी सात वाजता होणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्त व वारकरी संप्रदायाने घ्यावा असे निमंत्रण आमदार अभिजीत आबा पाटील मित्र मंडळ यांनी दिले आहे.

"कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण " मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते तसेच सहकार क्षेत्रातील डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.       श्रीपुर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार असून सर्व शेतकरी सभासद कार्यकर्ते तसेच स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक प्रेमी हे उपस्थित राहणार आहेत.       सोलापूर जिल्ह्याला तसेच महाराष्ट्राला लाभलेले विठुरायाच्या नगरीतील संत म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी शेतकरी कष्टकरी तसेच कामगार यांच्या कल्याणासाठी व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपले कार्य केले. कित्येक कुटुंबाचे कल्याण केले . आर्थिक डबघाईला आलेले साखर कारखाने आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी त्यांनी राबवलेली काटकसरीची मोहीम ही संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजली गेली. सहकार क्षेत्राप्रमाणेच महाराष्ट्र राज्य ...

" रस्तेच काय सर्व विकास कामे जनतेच्या दारात पोहोचवणार '..... आमदार अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) रस्तेच काय तर माढा विधानसभा मतदार संघातील सर्व गावांमधून  रस्तेच काय तर सर्वच विकास कामे मी जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणार आहे. असे माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील देशमुख वस्ती चव्हाण वस्ती ते कान्हापुरी या रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज त्या त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थ व कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.        या रस्त्यांमुळे या परिसरातील शेतकरी विद्यार्थी व्यापारी या सर्वांना लाभ होणार आहे. पाऊस काळाच्या मध्ये या रस्त्यावरून सर्वसामान्य जनतेला जाणे येणे अवघड झालेले होते. तरी पावसाळ्यात होणारी ही दळणवळणाची अडचण दूर होऊन वाहतूक व्यवसाय सुरू होईल. ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवून आणायला हा रस्ता विकासाच्या नव्या टप्प्याची सुरुवात करणार आहे.      यावेळी आमदार अभिजीत आबा पाटील पुढे बोलत असताना ते म्हणाले माढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावांमधून विकास कामे हे जातीने लक्ष देऊन केले जाणार आहे. या सर्व ...