पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"आषाढी यात्रेनिमित्त पंढरी नगरीमध्ये स्वच्छता मोहीम सुरू" मुख्य अधिकारी डॉ. प्रशांत जाधव

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) शेकडो वर्षापासून पंढरपूर तीर्थक्षेत्र येथे श्री विठूरायाच्या दर्शनासाठी पूर्ण देशभरामधून वारकरी संप्रदाय हा आषाढी, कार्तिकी, माघी,व चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरांमध्ये येत आहे. येणाऱ्या आषाढी यात्रा निमित्ताने पंढरपूर शहर व चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसर हा स्वच्छ राखला जात आहे. या स्वच्छतेची मोहीम सध्या पंढरपूर शहरांमध्ये सुरू असून आषाढी यात्रा दिनांक 17 जुलै 2024 रोजी भरत असून वारकरी भाविक भक्तांचे आरोग्य व पंढरपूर शहरातील रहिवाशांचे आरोग्य जपण्याचा उद्देशाने पंढरपूर नगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या अगोदर स्वच्छता म्हणून ही राबवली जात आहे.          चंद्रभागेचे वाळवंट जुन्या दगडी फुलापासून ते पुंडलिक मंदिर व त्याचा काही पुढील भाग या परिसरामध्ये वारकरी भाविक भक्त हे चंद्रभागेमध्ये स्नान करतात. या नदीचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने संपूर्ण नदी परिसर हा स्वच्छ ठेवला जात आहे. पंढरपूर नगरपरिषद ने एकूण 75 स्वच्छता कर्मचारी या मोहिमेवर नेमलेले असून या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नदी परिसर व सर्व नदीवरील घाट स्वच्छ केले जा...

"महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन पंढरपुर येथे मंजूर झाले". मराठा बांधव व आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नास यश

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). पंढरपूर येथील मराठा समाज बांधवांनी ज्याप्रमाणे मराठा आरक्षण हा मुद्दा जसा शासन दरबारी लावून धरला. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी शासनाने अर्थसहाय्य पुरवावे आणि पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्र असलेल्या शहरांमध्ये मराठा समाज बांधवांसाठी मराठा भवन ही आवश्यक असल्याचेही शासन दरबारी विविध आंदोलन व न्यायिक पद्धतीने शासन दरबारी विनंत्या करून पंढरपूर शहरातील येथे महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन या मराठा भवनास शासनाने निधी व जागा उपलब्ध करून दिली.        मराठा भवन पंढरपूर शहरांमध्ये व्हावे म्हणून पंढरपूर शहर व तालुका येथील मराठा बांधवांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला आज यश आलेचे दिसून आले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी देखील पंढरपूर येथे मराठा भवन होण्यासाठी व या मराठा भवनासाठी आवश्यक असलेली जागा व निधी शासनाकडून उपलब्ध व्हावी म्हणून केलेल्या प्रयत्नास त्यांना यश आल्याचे आज दिसून आले.      मराठा भवन उभा राहणार व त्यास निधी व जागा मिळाल्याच्या आनंदात  पंढरपूर शहरा...

"बॅंकरुपी लावलेले रोपटे तोडणाऱ्यांची संख्या जास्त " ह.भ प.गहिनीनाथ महाराज औसेकर.

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी). एखादा व्यक्ती समूह लहानसे रोपटे लावण्याचा प्रयत्न करतो. कारण लहानशा रोपट्याचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होऊन या झाडाखाली थांबणाऱ्याला सावली लाभणार असते. त्याचप्रमाणे फुले ,फळे लाभणार असते. परंतु अशा लहानशा रोपट्याला तोडण्याचे काम काही विघ्न संतोषी लोक करीत असतात. तसंच सध्याच्या जगामध्ये सर्वत्र स्पर्धा या वाढलेल्या आहेत. बँकिंग क्षेत्रामध्ये देखील स्पर्धा या वाढलेल्या असून अशा या बँक रुपी रोपट्याला तोडण्याचे काम काही मंडळी करीत असतात. परंतु त्या लहानशा रोपट्याची जपणूक  करून त्याला वाढवण्याचा प्रयत्न काही लोक करतात. आणि ते झाड मोठे होऊन सर्वांना सावली देऊ लागते. या बँक रुपी रोपट्याला मोठ्या झाडांमध्ये रूपांतर करण्याचे कार्य आजी-माजी संचालक मंडळाने केलेले आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी यांना देखील याचे श्रेय जाते.अशा प्रकारच्या उदाहरणांमधून ह भ प गहिनीनाथ औसेकर महाराजांनी दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेच्या सातव्या नवीन शाखेचे उद्घाटन इसबावी येथे करीत असताना त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.      पंढरपूर मर्चंट बँकेच्या 1961 सालच्या स्...

"महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणीला दरमहा१२०० ते १५०० रुपये देणार "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र मध्ये सत्ताधारी भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची सत्ता असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र राज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या असल्यामुळे या महिला व तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याच्या विचारात आहे.      मध्यप्रदेश शासनाच्या धर्तीवर गरीब महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत देण्याचे ठरवल्याचे समजते. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अमलात आणण्याचे ठरवले असून दारिद्र्यरेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना महिन्याला 1500 ते 1500 रुपये देण्यात येणार असून त्याचप्रमाणे 21 ते 60 वर्ष वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील महिला बरोबर विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांना देखील मदत देण्यात येणा...

यंदा देखील "आरोग्याची वारी पंढरीच्या दारी". आरोग्य मंत्रालयाचा उपक्रम.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक ,आंध्र प्रदेश व अन्य राज्यातून आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळा बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय हा दिंड्यांच्या सोबत येत असतो.      आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या वतीने यंदाच्या वर्षी देखील आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी ही योजना अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केले जात आहे. प्रस्थानाच्या पासून आरोग्य यंत्रणा ही कार्यरत राहणार आहे .     या आरोग्य शिबिरात अद्यावत आरोग्य यंत्रणे सह तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून 5000 च्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कार्यरत असणार आहे. भाविकांचे आरोग्य तपासणी करून तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागाकडून मोफत औषध पुरवठा, पिण्याचे पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या पालखी दिंड्यांच्या प्रत्येक...

"दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकची इसबावी येथे नवीन शाखेचा शुभारंभ"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड पंढरपूर. या बँकेची नवीन शाखा पंढरपूर शहरातील उपनगर इस बावी या भागामध्ये बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेची नवीन शाखेची उद्घाटन सोहळा होणार आहे.       अशी माहिती विद्यमान चेअरमन सोमनाथ सदाशिव डोंबे व विद्यमान व्हाईस चेअरमन विजयकुमार कांतीलाल कोठारी यांनी आज रोजी दिली.       व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी तसेच गरजू उद्योजक, गोरगरीब, कामगार, कष्टकरी तसेच शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखली जाणारी दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँक. या बँकेच्या अन्य भागामध्ये शाखा असून कुर्डूवाडी, टेंभुर्णी, महूद, करकंब,पंढरपूर येथील मार्केट यार्ड शाखा, आणि मुख्य शाखेच्या बरोबरीनेच आता इसबावी या परिसरातील ग्राहकांच्या सेवेसाठी या भागामध्ये दि.पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची नवीन शाखा सुरू होणार आहे.       दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव  बँकेने ग्राहकांच्यासाठी विविध योजना या सुरू केलेल्या असून त्या योजनेमध्ये नवी...

"पंढरपूरातील धोकादायक इमारती न.पा.पाडू लागले "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील धोकादायक इमारती या शहरातील मोक्याच्या ठिकाणी तसेच लहानशा बोळामधून या धोकादायक इमारती असून अशा धोकादायक इमारतींना पंढरपूर नगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.      या धोकादायक इमारतीच्या संख्या 113 असून अशा धोकादायक इमारतींना नोटीस बजावल्या आहेत. त्यापैकी सहा धोकादायक इमारती या त्या इमारतीच्या मालकाने स्वतःहून पाडलेल्या आहेत. आणि त्याच प्रमाणे नगरपालिकेने धोकादायक चार इमारती या पाडलेल्या असून उर्वरित एकशे तीन धोकादायक इमारती या शिल्लक असून त्या देखील खाली करण्याच्या प्रयत्नामध्ये नगरपालिका असल्याचे नगरपालिकेतील प्रशासन विभागाने सांगितले.        श्री विठ्ठल रुक्मिणी ची दर्शन ही गोपाळपूर पासून सुरू होत असते. नदी कडील बाजूला असलेले पंचमुखी मारुती मठ या मठाची एक बाजू दर्शन रांगेला लागून असल्याने त्या मठाची भिंत देखील धोकादायक असल्याने ती पाडण्यात येत आहे.      सध्या पाऊस काळ सुरू असल्यामुळे तसेच येणाऱ्या आषाढी यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात. या भाविकांची व पंढरपूर शहरातील रहिवाशांची जीव...

पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला मंत्रीपद का मिळू नये ॽ.

इमेज
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर विधानसभा मतदारसंघ झाल्यापासून ते आजपर्यंत या मतदारसंघाला मंत्रीपद हे लाभलेले नाही. काही वर्षांपूर्वी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना मंत्रिपदाच्या दर्जाचे एसटी महामंडळ या महामंडळाचे अध्यक्ष पद मिळाले होते. तदनंतर भारत भालके यांनी तीन वेळा आपली विधानसभेची टर्म पूर्ण केली. त्यांना देखील असे महामंडळ किंवा मंत्री पद मिळालेले नाही. आणि आज या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचेआमदार समाधान आवताडे आणि त्याच प्रमाणे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक या अभ्यासू आणि कार्य तत्पर असलेल्या युवा लोकप्रतिनिधींची मंत्रिमंडळामध्ये त्याचप्रमाणे एखाद्या कुठल्या महामंडळामध्ये वर्णी लागलेली नाही.      सध्याची भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या भाजपाच्या प्रचाराची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली होती. घोगडी बैठक ही नवीन कल्पना त्यांनी ग्रामीण भागामधील वाड्यावस्त्यावर  त्याचप्रमाणे गावामधून त्यांनीही घोंगडी बैठकीचे आयोजन करून जनतेशी सरळ संवाद त्यांनी साधलेला होता. त...

"डाॅक्टरं....तुझे सुरज कहूॅं की शैतान" ? डॉ.ऋचा रुपनवर( पाटील) आत्महत्या प्रकरण.... जनतेतून संतप्त सवाल.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सर्वसामान्यांच्या आरोग्याची जपणूक करणारा म्हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित आणि व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉक्टर या डॉक्टरी पेशाला समाजामध्ये एक मानाचे स्थान आहे. सर्वसामान्य लोक दुर्धर आजारी पडल्यानंतर किंवा मरणासन्न अवस्थेमध्ये असलेला एखादा पेशंट हा डॉक्टरकडे देवाच्या रूपामध्ये तो पाहत असतो. परंतु सांगोला तालुक्यामध्ये घडलेली नुकतीच एक घटना ती घटना म्हणजे सांगोला तालुक्यातील एक बडे उद्योग  समूहाचे मोठे प्रस्थ भाऊसाहेब रुपनवर म्हणून यांना ओळखले जाते. त्यांच्या विविध उद्योग समूह च्या माध्यमातून ते सांगोला तालुका तसेच अन्य तालुक्यामधून सुप्रसिद्ध आहे. या भाऊसाहेब रुपनवर यांचे चिरंजीव डॉ. सुरज रुपनवर यांचा विवाह ऋचा पाटील या डॉक्टर तरुणीशी झाल्यानंतर त्यांच्या विवाह नंतर थोड्याच दिवसांमध्ये दोघांमध्ये तक्रारी सुरू झाल्या. डॉ. सुरज यांचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ऋचा पाटील यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतल्याने  त्यांच्यामध्ये तक्रारी सुरू झाल्या. सूरज रुपनवर यांनी डॉ. ऋचा पाटील यांना मारहाण तसेच मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. आणि ड...

"विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांचे भवितव्य उज्वल"..... आमदार समाधान दादा अवताडे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आपण ज्या समाजामध्ये राहतो. त्या समाजाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवसेना शिंदे गट या पक्षाचे पंढरपूर शहर अध्यक्ष या नात्याने त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले आहे..त्यांनी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विविध थोर महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूर शहरातील युवकांना या महापुरुषाचे कार्य, कर्तृत्व हे मनामध्ये ठसवण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवजयंती , राजमाताअहिल्यादेवी होळकर जयंती महात्मा फुले जयंती ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती , छत्रपती संभाजी महाराज जयंती यानिमित्ताने त्यांनी  युवकांच्या मनावर महापुरुषाचे आदर्श विचार रुजवण्याच्या उद्देशाने त्यांनी हे सामाजिक कार्य, त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदनांचे विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्याला झोकून दिलेले आहे. त्यामुळे विश्वजीत ( मुन्ना) भोसले यांचे भवितव्य उज्वल आहे.   असे मनोगत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी कर्नल भोसले चौक येथे आयोज...

"मी पुन्हा येईन " म्हणणारे नेते आता म्हणू लागले"आता नक्की जाईन "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती मधील काही मान्यवर नेते हे आपल्या वक्तव्यामुळे, त्याचप्रमाणे अति आत्मविश्वासामुळे आणि विकास कामाबाबत न बोलता फक्त विरोधकावर टीका करणे. हा एक कलमी कार्यक्रम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मान्यवरांनी केल्याचे दिसून आले.      मी पुन्हा येईन असे म्हणून गत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे अति आत्मविश्वासाने त्यांनी गत विधानसभेचे निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीमध्ये 105 आमदार निवडून आणून देखील त्यांच्या या मी पुन्हा येईन या वक्तव्यामुळे ,त्याचप्रमाणे मुख्यमंत्री कोण होणार? ते स्वतः की उध्दव ठाकरे या वादंगावरुन शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षाचा झालेला काडीमोड आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आहे या मित्र पक्षाच्या सोबत शिवसेनेने केलेली गटबंधन या माध्यमातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मी पुन्हा येईन हे वाक्य फडणवीस यांचे हवेतच विरून गेले ते आपण सर्वांनी पाहिले आहे.      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

"महायुतीचे टरबूज ठाकरे,पवार यांनी फोडले".… मुंबई भाजपामय करण्याचे स्वप्न भंगले. महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण जगभरामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जाणारा भारत देश. या देशांमध्ये लोकशाही ची राजवट असून या लोकशाहीच्या राजवटीमध्ये मतदानाच्या माध्यमातून सत्ताधारी निवडण्याचे अधिकार येथील सर्वसामान्य जनतेला आहे. या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाच्या माध्यमातून देशातील जनता आपल्याला आवश्यक असलेले  सरकार ते आपल्या मतदानाच्या माध्यमातून निवडून देत असते.        संपूर्ण देशभरामध्ये आज 543 एकूण लोकसभेच्या जागा या आहेत. या जागेमध्ये एनडीएच्या 293 जागा त्यांनी मिळवलेल्या असून त्याचप्रमाणे इंडिया यांनी 234 जागा मिळवल्या. व इतर अशा 16 जागा या निवडून आलेले आहेत. भाजपा सरकारने 400 पार चा नारा देत आपल्या प्रचार मोहिमेस सुरुवात करीत, त्यांनी संपूर्ण भारत देशामध्ये प्रचार दौरा करून देखील त्यांना अपेक्षित असे 400 पार ही संख्या काढता आली नाही.       महाराष्ट्रामध्ये भाजपा त्याचप्रमाणे शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या सरकार कडून ही लोकसभेची निवडणूक लढवण्यात आली. परंतु त्यांना अपेक्षित असे यश प्...

"अब आयेगा मजा...भाजपा ची धुंदी घटक पक्ष उतरवणार "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरामधून एन डी ए या आघाडीला 293 जागा मिळालेल्या असून भाजपा पक्षाला 239 जागा या मिळवत्या आल्या. अन्य मित्र पक्षांची गोळा बेरीज ही 293 पर्यंत जाऊन थांबते.     2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत होते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत मित्र पक्ष देखील होते. या सर्वांची गोळा बेरीज करून प्रचंड बहुमत हे तत्कालीन काळामध्ये भाजपाला मिळालेले होते. परंतु आजच्या सद्य घडीला भाजपाने आपल्या पक्षाचे तीनशे जागा या निवडणुकीत निवडून येतील, आणि अन्य मित्र पक्षाची काही उमेदवार निवडून आल्यास याची संख्याही 400 पार होऊन जाईल असे त्यांचे अंदाज होते. परंतु या निवडणुकीतील निकालामुळे भाजपाचा अंदाज हा चुकलेला आहे असे दिसून येते.       गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपाने अन्य घटक पक्षांना दुय्यमतेचे स्थान देऊन त्यांना म्हणावे असे महत्त्व देण्यात आलेले नव्हते. परंतु आजच्या घडीला मित्र पक्षांना जवळ केल्याशिवाय किंवा त्यांना महत्व दिल्याशिवाय भाजपा हे सरकार स्थापन करू शकणार नाहीत हे तेवढेच खरे आहे. बिहार मधी...

"धकधक करने लगा" माढा, सोलापूर लोकसभा उमेदवारांची अवस्था.

इमेज
  पंढरपूर( प्रतिनिधी) उद्या देशभरातील लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निकालाची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला तसेच उद्योगपती, बेरोजगार तरुण ,शेतकरी, कष्टकरी ,आणि लोकशाहीला सर्वोच्च स्थानी मानणारे सर्वसामान्य जनता, तसेच विचारवंत, बुद्धिवंत या लोकसभेच्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहे.     देशातील विविध पक्षाचे उमेदवार राष्ट्रीय पक्ष काँग्रेस, भाजपा, राजद, तसेच असंख्य प्रादेशिक पक्ष या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली धडपड ही गेली कित्येक दिवसापासून आपण पाहत आहोत. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, कष्टकरी शेतकरी बेरोजगार तरुण महिलांचे प्रश्न हे संसदेमध्ये आग्रह हक्काने मांडून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपण केलेले कार्य त्याचप्रमाणे आपण येत्या पंचवार्षिक मध्ये कोण कोणते विकास कामे करणार आहोत. याची माहिती व जाहीरनामा त्यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली आह...