" वारकरी भक्तांच्या सुविधासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा "...... राजेंद्र आहेर
पंढरपूर ( प्रतिनिधी) विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या भावी भक्ता च्या सुविधासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पंढरपूर शहरातील पत्रकारांनी आवाज उठवावा असे आवाहन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी आज पंढरपूर येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पाचव्या महा अधिवेशनाच्या प्रसंगी बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंढरपूर शहरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्य संख्येने भाविक भक्त येत असतात. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोपाळपूर या शहरापासून सात ते आठ किलोमीटर लांब अंतरावरून ऊन वारा पाऊस झेलत हे वारकरी भाविक भक्त दर्शनासाठी रांगेत येत असतात या वारकरी बांधवांच्या सुरक्षासाठी त्यांना ऊन वारा पाऊस यापासून बचाव करण्यासाठी कायमस्वरूपी या दर्शनबारीला पावसापासून व उन्हापासून सुरक्षा होण्यासाठी शेड मारण्यात यावे जेणेकरून पाऊस व उन्हापासून त्यांचा बचाव होईल तसेच पंढरपूर शहर आता विकास आराखड्यावर असल्यामुळे या ठिकाणी लाखो व कोटीच्या संख्येने भाविक भक्त येणार आहेत या ठिकाणी जे काही विकास कामे...