पोस्ट्स

"मोहिते पाटील भाजपात असले की लोकशाही...भाजपा सोडली की मोहिते पाटील यांची ठोकशाही? असं कसं"? सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न?

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदार संघात लोकसभेची निवडणूक  होणार आहे. या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे पूर्वी भाजपा या पक्षात असलेले मोहिते पाटील परिवार आज घडीला भाजपा पक्ष सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या वतीने तुतारी हे चिन्ह घेऊन ते भाजपाच्या उमेदवाराविरोधात आज उभे ठाकले आहेत.      मोहिते पाटील परिवार हे गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे भाजपा मध्ये होते. परंतु विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी गेल्या तीन चार वर्षांपासून कुठल्याच बाबतीत विचार विनिमय हे पटत नसल्यामुळे मोहिते पाटील रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यापासून दूर गेलेले होते. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका म्हणून मोहिते पाटील भाजप नेत्यांना सांगत होते परंतु रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाच्या पहिल्या यादीतच माढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट  मिळाल्यामुळे मोहिते पाटील परिवार नाराज झालेला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघांमधून भाजपा कडे उमेदवारीची मागणी क...

अभिजीत पाटील यांना भाजपा ने बांधून घेतले............."माढा निवडणूक मध्ये मदत करा आम्ही कारखान्याला मदत करु".... देवेंद्र फडणवीस

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ, आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेच्या निवडणुकीमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना भाजपाने बांधून  घेतलेचे दिसून येते.श्री विठ्ठल साखर कारखान्यावरील कारवाई वर मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी मदत करावी. मग आम्ही श्री विठ्ठल  साखर कारखान्याला मदत करू. असे आश्वासन आज रोजी सोलापूर येथे अभिजीत आबा पाटील यांना भेटीचे दरम्यान मध्ये आश्वासन दिल्याचे समजते.          माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून भाजपच्या विरोधात अभिजीत आबा पाटील यांनी मध्यंतरी माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावरील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये ते भाग घेत होते. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी सहभाग आपला नोंदवला होता. हे सर्व पाहता भाजपा सार...

"राजकन्येच्या विरोधात गरीब शेतकऱ्यांचा मुलगा निवडणूक लढतो आहे.".... राम सातपुते.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). प्रस्थापित आणि विस्थापित या दोन्हीच्या लढाईमध्ये मी विस्थापिताच्या बाजूने आणि एका राजकन्याच्या विरोधात एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवीत आहे. असे वक्तव्य सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी आज पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसे या पक्षाने आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना राम सातपुते यांनी  केले.        मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारे महामार्ग हे हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बनवले आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गाला मंजुरी तसेच निधी हा मंजूर केलेला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत राशन आणि गोरगरिबांना घरकुल योजनेच्या माध्यमातून हजारो गरिबांना घरी बांधून दिले आहेत. उज्वला या योजनेच्या अंतर्गत महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सहा हजार रुपये असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेन्शन म्हणून जमा केली जात आहे. याचे सर्व श्र...

"प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित असा लढा आहे " ... डॉ.तानाजी सावंत. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी प्रचार सभा आयोजित केली.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) काँग्रेस सरकारच्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने फक्त प्रस्थापित लोकांचं भलं केलेले आहे. देशातील 80% विस्थापितांना त्यांनी आजपर्यंत न्याय दिलेला नाही. विस्थापितांचे भलं करण्यासाठी ,कल्याण करण्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी भाजपाचे सरकार सत्तेवर यावे लागले. भाजपा सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार, जातीय दंगली, बॉम्बस्फोट, आर्थिक घोटाळे अशा देशाला हानीकारक आणि जनतेला लुटू पाहणाऱ्या प्रस्थापित मंडळीवर कायद्याचा बडगा उभारला. तर हे काँग्रेस सरकार म्हणते आम्ही हुकूमशाही सुरू केली आहे .चुकीची कारवाई हे सरकार करत आहे असे खोटेनाटे आरोप काँग्रेस सध्या निवडणुकीच्या प्रचारद्वारांमध्ये करत आहे. असे डॉ. तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसे या पक्षाच्या नियोजनाखाली आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त येथे आले. असता प्रचार सभेमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .       भाजप सरकारच्या राज...

"दोन लाखाच्या वर मताधिक्याने महायुतीचे उमेदवार निवडून आणणार" मनसे नेते दिलीप बापू धोत्रे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . उद्याच्या होऊ पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे राम सातपुते या दोन्ही उमेदवाराला मनसेच्या वतीने मी खात्री देतो की दोन लाखाच्या वर मताधिक्याने हे दोन्ही उमेदवार निवडून येणार. असे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मनसे पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेमध्ये पंढरपूर येथे व्यक्त केले.      राज ठाकरे यांनी मनसेच्या वतीने मोदी सरकारला विना अट आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. मोदी सरकारने केलेल्या कार्याला पाठिंबा देत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे. मोदीना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान निवडून देण्यासाठी मनसेच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिलेली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे ठरवलेले आहे.        मोदी राजवटीमध्ये हिंदू बांधवांना अपेक्षित असल...

अभिजीत पाटील यांच्या वरील कारवाई म्हणजे भाजपा ची "विनाश काले विपरीत बुद्धी "...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे या कारखान्यावर कर्जफेड न केल्यामुळे उत्पादित साखर गोडाऊनला सील लावण्यात आले. या घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी तसेच संचालक मंडळ हे मोठ्या संकटात पडल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे.      गेली काही वर्ष बंद स्थितीत असलेला हा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करण्याच्या उद्देशाने अभिजीत पाटील यांनी प्रयत्न केला. व त्या प्रयत्नाला त्यांना यश आले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपण कसा चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवू शकतो. हे आपल्या प्रचारा मध्ये त्यांनी शेतकरी ऊस उत्पादकाला त्यांनी पटवून सांगितले. व कारखाना निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर हा कारखाना गेली दोन वर्ष सुरळीतपणे सुरू करून शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला दर देण्याचा त्याने प्रयत्न केला असताना थकीत कर्ज पेड न केल्यामुळे आज या कारखान्याला त्याच्या गोडाऊनला सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादक, कर्मचारी व संचालक मंडळ ही चिंतेत पडले.  ...

"मोदींच्या गॅरंटी चे काही खरे नाही".... सुशीलकुमार शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी)" मोदी यांच्या गॅरंटीचे काही खरे नाही." असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील  कुमार शिंदे यांनी आज पंढरपूर येथे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना या संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने आयोजित आज वार्ता लाप घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे यांनी या वार्तालाप मध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.     सुशील कुमार शिंदे वार्तालाप मध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा सरकारने फक्त आश्वासन देण्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेले नाही. बेरोजगार तरुणांना दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळवून देतो म्हणाले, परंतु ते दिले नाहीत. रोजगाराची गॅरंटी त्यांनी दिले नाही. महागाई, गॅस, पेट्रोलचे दर कमी करतो म्हणाले याची त्यांनी गॅरंटी दिली होती. पण ती देखील फसवी निघाली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देतो म्हणाले परंतु आज शेतकरी कर्जबाजारी झालेला दिसून येत आहे. अशा या मोदी सरकारचे व मोदीची गॅरंटी ही फक्त फसवी आहे . मोदींच्या गॅरंटीचे  काही ...