"आमदार समाधान दादा अवताडे यांनी मरीआई वाले समाजबांधवाची केली दिपावली गोड"...
पंढरपूर ( प्रतिनिधी ) मरीआई वाले समाज हा गेल्या कित्येक वर्षापासून वंचित असलेला समाज म्हणून ओळखला जातो. या मरी आई वाले समाजामधील बांधव अतिशय हलकीचे जीवन जगत आहेत. हे मरी आई वाले समाज बांधव गावाबाहेरील उघड्या शेतमाळावर आपल्या झोपड्या टाकून राहतात राहूटी टाकून राहतात. ऊन, पाऊस, वारा ,थंडी अशा परिस्थितीमध्ये ते या झोपडी मधून राहतात, राहुटी मधून राहतात. अशा बांधवांना दीपावलीच्या निमित्ताने मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी या ठिकाणी राहत असलेल्या मरीआई वाले समाजातील बांधवांना दीपावलीच्या निमित्ताने साडी, कपडे फराळाचे साहित्य यांचे वाटप करून त्या गोरगरीब असलेल्या मरीआईवाले समाज बांधवांची दीपावली यंदाच्या वर्षी आमदार समाधान आवताडे यांनी गोड केली. मरीआई वाले समाज बांधवांनी आमदार समाधान आवताडे यांची आभार मानले.
या वेळी मरीआई वाले समाज बांधव तसेच गावकरी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा